जीवनातील येणाऱ्या अडचणी दूर करण्याचे उत्कृष्ट उपाय.....

जीवनातील येणाऱ्या अडचणी दूर करण्याचे उत्कृष्ट उपाय.....

नमस्कार मित्रांनो.. 

तुम्ही खूप वेळा विचार करत असतात की आपण काय ? करत आहोत. आपल्या जीवनात काय ? घडत आहे. व आपण जे करतोय त्या बाबतीत लोक काय म्हणत असतील असे खूप प्रश्न आपल्या मनात येत असते.

हे पूर्णतः खरे आहे व हे सत्य स्थिती पण आहे व हे प्रश्न जास्तीत जास्त करून तरुण वर्ग यांच्यामध्ये व विद्यार्थी वर्ग  या वर्गाला असे प्रश्न खूप पडतात . पण सत्य स्थिती मान्य केली तर हे प्रश्न पडणे पण अत्यंत गरजेचे आहे . कारण आपण एक मनुष्य आहोत , व आपण एका विशिष्ट समाजात समाज जीवन जगताना हे विचार करणे की समाज विचार काय करेल ही खूप महत्त्वाची आहे .

पण जर समाजाचाच विचार करत राहिलो तर आपला विचार व विकास कधी ? करणार , हे पण आहे त्यासाठी फक्त आपण त्यांचा विचार करायचा असेल तर सकारात्मक  करावा फक्त आपल्या हिताचा विचार असेल तर त्यालाच प्राधान्य द्यावे , कारण की मी असे खूप लोकांना पाहतो की स्वतः काहीच करत नाहीत पण दुसऱ्यांना ज्ञान देत असतात व काही लोक असे असतात की अर्धवट ज्ञान असतो पण दुसऱ्यांना तर असे उद्देश ! देत असतात की त्यांना या गोष्टीत महारत असेल मग या दोन्हीपैकी एक तिसऱ्या प्रकारचे लोक असतात. हे आपल्या नजरेत नेहमीच खटकतात. ते म्हणजे जे आपल्या क्षेत्रात कार्यरत असतात पण ते आपल्यापेक्षा अधिक प्रतिभाषाली व चांगल्या स्थितीत असतात .

पण आपण यांचा नकारात्मक विचार केला तर आपल्याला काही फायदा होणार नाही पण आपलेच नुकसान झाले ते दिसून येईल, पण आपण जर यांचा चांगला विचार केला व जर आपण त्यांचा या गुणांचा आपल्या जीवनात फायदा पण करून घेऊ शकतो , जसे की ज्यांना काही माहीत नसते पण ज्ञान तर देत असतात तर त्यांचा आपण सकारात्मक विचार केला तर ते आपली जिद्द निर्माण करण्यास ऊर्जा म्हणून पण ते कार्य करू शकतात व जीत पूर्णपणे ज्ञानी असतात त्यांना आपण आपले स्पर्धक पण समजू शकतो व त्यांना स्पर्धा करून आपण पण यशस्वी होऊ शकतो या विद्यार्थी जीवनात व समाजात वावरताना खूप अशा गोष्टी असतात की त्या आपल्यासाठी नुकसानकारक असतात .

त्यावेळी हे जे वरील तीन प्रकारचे व्यक्ती आहे यांचा विचार करायला हवा व करावाच ! म्हणजे आपले जीवन सुरळीत चालेल कारण की या वयात आपले मन हे एका ओढाळ वासरू सारखे असते.

जसे की ओढाळ वासरूला जिथे हिरवळ दिसेल तो तिथे धाव  घेतो तसेच आपले मन असते त्यांना आळा घालण्यासाठी या समाजात लोक, घरातील माणसे, पालक यांचा विचार करणे पण गरजेचे असते असे पण नाही की आपण यांचाच विचारत करत बसावा व आपले उद्दिष्टे ध्येय सोडून आपण फक्त यांना खुश करत बसावे असे पण नाही.

या गोष्टीचा एक वेळ अवश्य विचार करा कारण की आपण जर हे विचार केले नाही तर खूप मोठे नुकसान पण होऊ शकतो व आपल्याला वेळ निघून गेल्यावर मग काही साध्य करता येणार नाही.

धन्यवाद..... 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow