​मुलांना मोबाइलपासून कस दूर ठेवावे

​मुलांना मोबाइलपासून कस दूर ठेवावे

मुलांना मोबाइलपासून कस दूर ठेवाल

मुलांना तुमचा वेळ हवा असतो. तो दिलात की मुलं तुमच्या अवतीभवती राहतील. मुलांना मोबाइलपासून दूर ठेवण्याचा हा उत्तम मार्ग आहे. मुलांसोबत त्यांचे खेळ खेळा ज्यामुळे मुलं त्या भांड्यामध्ये रमतील. तसेच मुलांना ब्लॉक, पेंटिंगमध्ये रमवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या कल्पना सांगा. यामुळे मुलं अतिशय उत्तम संगोपनात वाढतील.

​मुलांना निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जा

एक सोपा उपाय आहे ज्यामुळे तुम्ही मुलांना उत्तम बालपण किंवा आयुष्य देऊ शकतो. मुलांना निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जा. कारण मुलांना निसर्गाच्या सानिध्यातून अनेक गोष्टी शिकता येतात. ही मुलं वाईट सवयींपासून दूर राहू नयेत यासाठी हा अतिशय उत्तम मार्ग आहे. मुलांना प्रवासाला घेऊन जा. प्रवास प्रत्येकाला समृद्ध करत असतो. अशावेळी तुम्ही मुलांच्या खूप जवळ जाऊ शकता. मुलांमध्ये चांगला उत्तम बॉन्ड निर्माण होण्यासाठी या गोष्टी नक्कीच फायदे करतात.

शिक्षणामागील योग्य उद्देश समजून घ्या

शिक्षणामागील मुख्य उद्देश पालकांनी मुलांना सांगितला पाहिजे. शिक्षणाचं महत्व हे फक्त कागदोपत्री नाही तर यामुळे त्या मुलाचा सर्वांगिण विकास होतो. बुद्धी आणि चेतना दोन्हीचा योग्य पद्धतीने विकास होण्यासाठी शिक्षण अत्यंत महत्वाच आहे. शिक्षणाचा वापर आर्थिक इंजिनाप्रमाणे होत चालला आहे. यामध्ये माणूस हळू हळू अडकत चालला आहे. शिक्षणाचा उपयोग जागरूकता वाढवण्यासाठी करायला हवा. कायमच शिक्षणाला एका वेगळ्या स्तरावर नेण्यासाठी करायला पाहिजे. शिक्षणामुळे माणसातील माणुसकी वाढली पाहिजे. सर्वांना समान वागणूक देणे, सर्वांशी आपुलकिने वागणे हे शिक्षणातून शिकायला हवं.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow